Sunday, May 18, 2008

आबा तुमचे डबडे बंद करा!

आबा पाटील म्हणजेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गॄहमंत्री आर. आर. पाटील. यांच्याकडे असलेल्या पदाशी संबधित कामे करण्याऐवजीदुसरेच काहीतरी करत बसण्यात यांना भारी आवड. सध्या ठाणे लोकसभेची पोटनिवडणूकीच्या प्रचारात तर यांनी सूर आणि तालसोडून बेताल वक्तव्य करण्याचेच ठरविलेले दिसते.

म्हणे 'शिव'वडा नावामुळे शिवाजी महाराजांची बदनामी होतेय. आबा तुम्ही म्हणताय हे? अहो, एका परदेशी जेम्स लेनने महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल घाणेरडे लिखाण लिहिले. त्याच्या मुसक्या बांधायला हव्या होत्या. पण तुम्ही त्या प्रकरणावर मला वाटते अजुन अभ्यास करत बसला असाल!

ज्या भिवंडीमध्ये तुमच्या गृहखात्याच्या पोलिसांचे धर्मांध मुसलमानांनी अक्षरशः तुकडे तुकडे केले त्यांचे तुम्ही काय वाकडे केलेत? अहो सच्चरबद्दल बोलताना म्हणता कि सच्चर साठी रस्त्यावर उतरायची तयारी दाखवता मग धर्मांध मुस्लिमांबद्दल बोलताना शेपटी घालून का बसता?

तुमच्या पक्षाची धोरणही अजबच! ज्या सोनियाला परदेशी म्हणून विरोध करता तिच्याच मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगता. (चुकिचा अर्थ घेऊ नका). तुम्हाला बंद दरवाजाच्या आतील बारबालांमुळे समाज बिघडताना दिसतो पण क्रिकेटच्या मैदानात सर्वांसमक्ष नागड्या (होय नागड्याच टिचभर चिंध्यांना कपडे कसे म्हणायचे?) नाचणार्‍या परदेशी चिअरलिडर्स चालतात.

बर्‍याच गोष्टी आहेत आबा, तुम्हालाही माहिती आहे तुमचा किती गोंधळ उडालाय ते. ठाण्यातील लोकसभा निवडणूकित तुमच्या पक्षाची अवस्था खुप वाईट आहे. कुणबी सेनेने तुमचा पाठिंबा काढून शिवसेनेला दिला. ठाण्याच्या पालकमंत्री भ्रष्ट आहे हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे. अशा ठाण्यात तुमचे डबडे वाजवून काहीच होणार नाही. उगाचच तुम्ही वाद निर्माण करताय. तुम्ही उद्धवजींवर वैयक्तिक पातळीवर टिका करताय कारण ह्याच उद्धवजींनी शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यांवर तुम्हाला आणि तुमच्या पवार साहेबांना पाणी पाजलेय. ठाणे लोकसभा मतदार संघ हा कायम प्रतिष्ठीत लोकप्रतिनिधीचा मतदार संघ ओळखला जातो तिथे तुमच्या गणेश नाईकचा संजिव काय दिवे लावणार आहे. उगाचच त्रास करून घेऊ नका आराम करा. कशाला स्वतःची इज्जत चव्हाट्यावर आणताय.

ताजी बातमी: आबा पाटलांच्या सुचनेची दखल घेऊन संगणक बनविणार्‍या कंपन्यांनी मेणबत्तीवर चालणारा संगणक बनवायला घेतलाय येत्या दोन वर्षात तो आबा पाटलांना समर्पित करण्यात येणार आहे.

Wednesday, May 14, 2008

राजसमर्थक राजू परूळेकरला चिन्मयचे उत्तर....

हा लेख माझा मित्र चिन्मय कुलकर्णी याने लोकप्रभा मधील एका शिवसेना विरोधी लेखनाला उत्तर म्हणून लिहिला आहे. मुळ लेख तुम्ही पुढील लिंक वरूनही वाचू शकता... http://gandharvablog.blogspot.com/2008/05/blog-post_13.html

तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते.-------------------------------------------------------


राजसमर्थक राजु परुळेकर यांस ,
आपला लोकप्रभातील 'होय हा महाराष्ट्र धर्म आहे ' हा 'अविचार' वाचला.लेख इथे वाचा -http://www.loksatta.com/lokprabha/20080509/maha.htm
लेखामधील अनेक गोष्टी बरोबर आहेत (ज्याचा मी विरोध करत नाही).अतिशय अभ्यासपुर्ण काही मुद्दे मांडले आहेत उदा.बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्दे. पण ८ बरोबर मुद्द्यांमधे २ निव्वळ चुकिचे तपशील घुसवुन तेही अभ्यासपुर्ण आहेत असे भासवुन दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला आहे.मला ७०% लेखात चुक वाटत नाही.काँग्रेस नेत्यांबद्दल लिहिलेल्या गोष्टीही बरोबर आहेत.पण शिवसेनेवर केलेल्या आरोपांमधे तर निव्वळ द्वेशभावना दिसते. शिवाय सर्वात मोठा आक्षेप(जो आजकाल जवळपास सगळ्याच पत्रकारांबाबत आहे)तो म्हणजे 'राजकीय कंपुबाजी'.

तुम्ही एक वाक्य लिहिल आहे की '१९९० पासुन शिवसेनेनी महाराष्ट्र धर्माच जेव्हढ नुकसान केल आहे तेव्हढ काँग्रेसनीही केलेल नाहि'.तुमच म्हणन अस आहे की शिवसेनेनी हिंदुत्व भैय्यांसाठी पत्करल.बाळासाहेबांनी सत्तेसाठी ड्रेस बदलला. याबद्दल मी सांगु इच्छितो की बाळासाहेबांनी पुर्वीपासुनच धर्मांध मुस्लिमांविरुध्द भुमिका घेतलेली आहे. आर्.के. करंजिया यांच्या त्या काळातील प्रसिध्द 'ब्लिट्स' या साप्ताहीकाने बाळासाहेबांच्या नेहमीच्या मुस्लिम व कम्युनिस्ट विरोधी भुमिकेमुळे त्यांच्यावर अनेकदा तिखट हल्ले केले होते. बाळासाहेबांनी १९८० मधे म्हटल होत की "They [Muslims] were spreading like a cancer and should be operated on like a cancer. The...country should be saved from the Muslims and the police should support them [Hindu Maha Sangh] in their struggle just like the police in Punjab were sympathetic to the Khalistanis". १९७२ साली ए.सी.भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरावर होणार्‍या हल्ल्याविरुध्द बाळासाहेब ठाकर्‍यांकडे मदत केली होती. प्रभुपादांच्या चरित्र ग्रंथात बाळासाहेबांचा उल्लेख 'हिंदु अधिकारांसाठी लढणार्‍या नेत्यांमधील मुंबईतील सर्वात मोठा नेता' असे आहे.

तुम्ही पुढे असेही लिहिता की "हिंदुत्वाचे तुणतुणे वाजवुन शिवसेनेनी महाराष्ट्राची उर्जा दिल्ली,भैयांच्या सरंजामशाही अर्पित केली". शिवाय तुम्ही संघालाही विरोध केलेला आहेच म्हणजे एकुणच हिंदुत्व म्हणजे 'उत्तर भारतीयांपुढील लाचारी' असा तुमचा गैरसमज झालेला दिसतो.तुम्हाला मी सांगु इच्छितो की हिंदुत्व ही संकल्पनाच मुळात महाराष्ट्राने दिलेली आहे. हिंदुत्वाचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे मराठीच होते तर वासुदेव बळवंत फडकेही(father of militant nationalism and Hindutva) मराठीच होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांपासुन ते हेगडेवारांपर्यंत आणि गोळवलकर गुरुजींपासुन बाळासाहेब ठाकर्‍यांपर्यंत हिंदुत्वाचे महत्वाचे नेते मराठी आहेत. लोकमान्य टिळकांनाही हिंदुत्वाचे पितामह म्हटले जाते तर तुम्ही उल्लेख केलेल्या प्रबोधनकार ठाकर्‍यांनीही 'हिंदुत्व' नावाचे पुस्तक लिहिले होते,जातीपातींच्या सीमा गाडण्यासाठी अनेक अनिष्ट प्रवृत्तींवर प्रखर टिका केली होती व त्याचप्रमाणे प्रबोधनकारांनी ख्रिश्चन मिशिनरीजच्या धर्तीवर हिंदु मिशिनरिज बनवाव्यात अशी संकल्पनाही मांडली होती.तर अशा अनेक थोर मराठी व्यक्तिमत्वांनी(बाळासाहेब ठाकरे वाचु नका) हिंदुत्व देशाला दिले.या महान लोकांच्या भुमिकेला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्र धर्मालाच विरोध करणे आहे. या लोकांनी काय हिंदुत्व भैय्यांसाठी केले काय??

हिंदुत्वानीच मराठी माणुस दिल्लीवर वर्चस्व ठेवु शकतो असे मला वाटते.मागे एनडीए सरकारने काही निर्णय घेतल्यावर काँग्रेस व धर्मनिरपेक्ष पक्षांनी म्हटले होते की 'हे सरकार दिल्लितुन नाही तर नागपुर,पुण्यातुन चालते'. बाळासाहेबांनी घेतलेल्या प्रखर भुमिकेमुळे दिल्लीही हादरत असे.एक-दोन उदाहरण देतो.वाजपेयी सरकार पाकीस्तानशी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेउ लागले तेंव्हा शिवसेनेनी मुंबईतील वानखेडे स्टेडीयमचे पिच खोदले व 'मुंबईत सामना होउ देणार नाही' असे बजावले. वाजपेयींना भुमिका बदलावी लागली. दिल्ली महाराष्ट्रापुढे बिनशर्त झुकली.फारुख अब्दुल्लांच्या 'नॅशनल काँफरन्स्'ने एनडिए सरकारला पाठिंबा दिला व फारुक अब्दुला राष्ट्रपती बनवावेत अशी अट ठेवली. वाजपेयींनी ती मान्य केली. बाळासाहेब पुन्हा बरसले आणि 'ऑटोनॉमीची मागणी करणार्‍या फारुख अब्दुल्लाला राष्ट्रपती बनवु नये'. पुन्हा युपीचे वाजपेयी महाराष्ट्राच्या बाळासाहेंबांसमोर गप्प झाले. खर्‍या महाराष्ट्रप्रेमी माणसाला या गोष्टींचा आनंद होतो. अजुन एक गोष्ट सांगावी वाटते ती म्हणजे पाकिस्तानला भारताने २० दहशदवाद्यांची मागणि केल्यावर ,पाकिस्तानने 'आम्हाला बाळ ठाकरे द्या' अशी मागणि केली होती.काही पाकीस्तानी लोकांनी मला सांगितल होत की 'पाकीस्तानका बच्चा बच्चा बाल ठाकरेको जानता है और उसको गाली देता है'. भारताच्या शत्रु राष्ट्रातील लोक एका अशा माणसाला घाबरतात ज्याच्याकडे एकही पद नाही व तो माणुस माझ्या महाराष्ट्राचा आहे याचा खर्‍या महाराष्ट्रप्रेमीला अभिमान वाटतो.बाळासाहेबांच्या बोलण्याने दिल्ली तर हादरतेच पण पाकिस्तानही हादरते हे यातुन स्पष्ट होते. सरंजामशाहीची उपमा किती मुर्खपणाची आहे हे यातुन स्पष्ट आहे. तुम्ही स्वतःच लिहिता की 'उत्तर भारतावर मुघली साम्राज्याचा पगडा आहे'. मग या मुघली साम्राज्याच्या पगडा असलेल्यांसाठी बाळासाहेबांनी धर्मनिरपेक्ष राजकारण केले असते ना!!!!मुळात बाळासाहेबांनी पुर्वीपासुनच हिंदुत्व आणि मराठी हे दोन्हीही मुद्दे घेतले होते. ज्याची ज्या वेळी जास्त गरज त्याच्यावर त्या वेळी त्यांनी जास्त emphasis दिलेला आहे. तुमच्या म्हणन्याप्रमाणे जर सेनेनी मराठीत्व सोडलेच असते तर मग हिंदुत्वाच्या मुद्द्याशी फारकत घेउन प्रतिभाताईंना फक्त 'मराठी महीला' म्हणुन राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिलाच नसता.युती शासनाने परप्रांतीयांचे येणे थांबवण्यासाठी 'पर्मिट सिस्टीम'आणायचा प्रयत्न केला होता हा तपशील तुम्ही कसा काय विसरलात??बाळासाहेबांनी 'पॉप्युलॅरिस्ट पॉलिटीक्स' केलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच शिवसेना आत्तपर्यंत फक्त एकदाच शासन करु शकली आहे.हिंदुत्वाचा मुद्दा असुनही २ वर्षापुर्वी झालेल्या मुंबई बाँबहल्ल्यांनंतर ज्या मुस्लिमांनी रॅलीज काढुन हल्ल्याचा निषेध केला त्या मुस्लिमांना बाळासाहेबांनी सलाम केलेला आहे.मागच्या गणेशोत्सवात लालबागच्या गणपती समोर मुस्लिमांनी फटाके फोडून मिरवणुकिचे स्वागत केले तेंव्हा बाळासाहेबांनी अग्रलेखातुन त्या मुस्लिमांचे अभिनंदन केले होते.काही लोकांना ही बाळासाहेबांची धरसोड वृत्ती वाटते .मला वाटते 'जे मनात ते ओठात' अशी सरळ वृत्ती आहे.

आता जैनांच्या टॉवर्सचा मुद्दा.सेनाप्रमुखांनी जेंव्हा वाढदिवसाला मुंबईतील बिल्डर्सना 'टॉवर्समधील ५०% जागा मराठी माणसाला द्याव्यात' असा दम भरला होता तेंव्हा तुम्ही लोकप्रभा मधे 'शाब्दिक खेळ' करुन याला अप्रत्यक्षपणे विरोध केला होता हे विसरु नये.शिवाय त्याच लेखात तुम्ही बाळासाहेबांना नेहरुंचे उदाहरण देउन सहिष्णुतेचे धडे दिले होते. आता त्याच नेहरुंचे तुम्ही कट्टर विरोधक बनला आहात.बाळासाहेबांना सहिष्णुतेचे धडे देणारे राजु परुळेकर एकदम मनसेच्या भैयांविरुध्दच्या मारामार्‍यांना 'स्वाभिमान्,अस्मिता' म्हणुन बिनशर्त पाठींबा देतात्.अरेच्चा, मग सहिष्णुतेच काय झाल???का राज ठाकरेंना तो नियम लागु होत नाही??कृष्णा देसाई ते श्रीधर खोपकर यांच्या उदाहरणातुन तुम्ही रमेश किणीला खुबीने वगळता.हे double standards का??आता महाराष्ट्र धर्म ,संस्कृती म्हणणारे तुम्ही त्याच लेखात लिहिता की 'मुळात मराठी असो अथवा अन्य कुठली असो ,संस्कृती ही वाढते वा तिचा र्‍हास होतो.चंद्राप्रमाणे तिची अवस्था असते.ती टिकवता येत नाही.' आता राज ठाकरेंनी शिवसेनेचा मुद्दा घेतल्यावर तुम्ही त्यांना का सांगत नाही की 'संस्कृती चंद्राप्रमाणे असते ,टिकवता येत नाही.तुम्ही टिकवायचा प्रयत्न करु नका'. पण नाही आता तुमचे म्हणने आहे की मुंबईत मराठी संस्कृती टिकवली जाउ शकते. तीनच महिन्यात इतका वैचारीक फरक???

संजय निरुपम जेंव्हा सेनेत होता तेंव्हा त्यानेही भुमिपुत्रांची भुमिका जोरात मांडली होती.अनेक कार्यक्रमांमधे त्याने 'परप्रांतियांचे मुंबईत येणे रोखले पाहीजे' असे दणकावुन सांगितले होते. ते कार्यक्रम मी स्वतः बघितले आहेत्.आता पार्टी बदलली आणि तोही बदलला.उध्दव ठाकरेंनी छट पुजेला हजेरी लावली तर काही महत्पाप केले असे मला बिल्कुल वाटत नाही. आम्ही परदेशात राहुन गणेशोत्सव्,शिवजयंती साजरी करतो.त्याला परदेशी लोक उपस्थित असतात्.मग परदेशात कोणी म्हटले की 'इथे फक्त याच देशाचे सण साजरे करा' तर ते चुकिचे आहे.तुम्ही म्हणता की 'राज ठाकरे बदलणार नाहीत ना हा प्रश्नच गौण आहे'. याचा काय अर्थ आहे??तेही उद्या बदलणार असतील तर मराठी माणसाने त्यांना का पाठींबा द्यावा???शिवाय त्यांच्या पक्षाचे बदलणे आत्तच सुरु झाले आहे.खालील बातमी वाचा-http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2889253.cmsज्या वेळी भैय्यंना मारल्याच्या जखमाही भरल्या नव्हत्या त्या वेळी मनसे भैय्यांबरोबर उत्तर प्रदेशि स्टाईलमधे होळी खेळत होता.याचा तुम्ही का विरोध केला नाही??पण उध्दवने भैय्यंच्या सणाला उपस्थिती लावली तर ते चुकिचे पण राजची मनसे भैय्या स्टाईलमधे धुमधडाक्यात होळी साजरी करते ते चालते??भैया चालत नाहीत ना मग मनसेतले चौबे का कोण ते,रीटा गुप्ता,हिंदी साहित्यिक वागीश सारस्वत तुम्हाला कसे चालतात???इंडीअन एक्प्रेसला अशीही बातमी होती की मारामार्‍यांनंतर मनसेतील भैय्यांचे सदस्यत्व वाढले आहे.माझा विरोध भैय्यांबरोबर होळी साजरी करण्याला नाही पण त्याचप्रमाणे सेनेच्या नेत्यांच्या युपी सणांच्या उपस्थितीलाही नाही.

आता मराठीचा मुद्दा-भैय्या इथे येउन मराठी शिकत नाहीत ,मराठी संस्कृतीशी एकरुप होत नाहीत असा आक्षेप घेतला जातो.माझा प्रश्न असा आहे की मुस्लिमांचे काय्???ते तर इथे पिढ्यानपिढ्या रहात आहेत पण त्यांना मराठी बोलता येत नाही.८०-९०% महाराष्ट्रीय मुस्लिम उर्दुच बोलतात. मराठी संस्कृतीशी त्यांना काहीही देणघेण नाही.त्यांना फक्त इस्लामी संस्कृती महत्वाची वाटते.त्यांच्या विरुध्द तुम्ही कधीच काहीच का लिहित नाही??ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्दे तुम्ही भरभरुन दिले आहेत तेच बाबासाहेब मुस्लिमांबद्दल बघा काय म्हणतात(मुळ मराठी शब्द सध्या उपलब्ध नाहीत्,अनुवादात अर्थबदल केला असा माझ्यावर आरोप होउ नये म्हणुन उपलब्ध असलेला मुळ हिंदी अनुवाद देत आहे) "मुसलमानों के लिए है कुरान गैर मुसलमान को मित्र बनाने का विरोधी है इसलिए हिन्दू सिर्फ घृणा और शत्रुता के योग्य ही हैं मुसलमानों की निष्ठा भी केवल मुस्लिम रास्त्रो के प्रति होती है इसलाम सच्चे मुसलमान हेतु भारत को अपनी मातृभूमि और हिन्दुओ को अपना निकट सम्बन्धी मानने की आज्ञा नहीं देता, संभवतः यही कारण था की मौलाना मोहमद अली जैसे भारतीय मुसलमानों ने भी अपने शरीर को हिंदुस्तान की अपेक्षा येरुशेलम में दफनाना अधिक पसंद किया कांग्रेस में मुसलमानों की स्थितियो के सम्पर्दायिक चौकी की तरह है गुंडागर्दी मुस्लिम राजनीती का स्थापित तरीका हो गया है इस्लामी कानून समाज सुधर के विरोधी हैं वे धर्मनिरपेक्षता को नहीं मानते हैं मुस्लिम कानूनों के अनुसार भारत हिन्दुओ और मुसलमानों की समान मातृभूमि नहीं हो सकती वे भारत जैसे गैर मुस्लिम देश को इस्लामिक देश बनाने में जिहाद 'आतंकवाद' का संकोच नहीं करते."आता या मुस्लिमांविरुध्द बाळासाहेबांनी आघाडी उघडली तर काय चुकल???बर तेही सोडा. मुंबईत जवळपास ५-७लाख बांग्लादेशी आहेत. त्यांना इथल्या भाषेशी ,संस्कृतीशी काहीही देणघेण नाही,ते भारताच्या (फक्त मराठी ओळख असणार्‍यांनी हा शब्द 'मराठी लोकांना' वाचावा) आंतरिक सुरक्षेला सर्वात मोठा धोका आहेत.हे मी म्हणत नाही तर सुपरकॉप के.पी.एस.गिल म्हणतात. त्यांना हाकलण्यासाठी तुम्ही कधीच का लिहित नाही???त्यांना हाकलल्यास गुन्हेगारी कमी होईल्,गर्दी कमी होईल.मराठी माणसाची भविष्यात होणारी हानी वाचेल.भारतात सध्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा मोठा प्रश्न आहे.महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. विदर्भातील शेतकरीही मराठीच आहेत्.उध्दव ठाकरे या शेतकर्‍यांची एकजुट करवुन आणत आहेत्,त्यांच्यासाठी आंदोलन करत आहेत्.पण या आंदोलनांना पाठींबा देण्याऐवजी तुम्ही तुमच्या स्तंभातुन याची 'आंदोलनांचा खेळ' म्हणुन खिल्ली उडवली आहे!!!विदर्भातील शेतकरी मराठी नाहीत का???का फक्त मुंबई-ठाण्यात मराठी माणुस रहतो???जिथे खराखुरा 'मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न' आहे तिथे तुम्ही गप्प बसता.आज विदर्भात होणार्‍या आत्महत्यांकडे महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष केलेले आहे.उध्दव ठाकरे सोडले तर कोणीही मराठी नेता त्यात 'इंटरेस्ट' घेत नाही. उद्या या वागणुकीला कंटाळुन वेगळ्या विदर्भाच्या मागणीने जोर धरला व संयुक्त महाराष्ट्र फुटला तर्???मग तुम्ही परत मोठेमोठे अभ्यासपुर्ण लेख लिहाल्.पण सध्या उध्दव ठाकरेंना पाठींबा देणार नाही.

तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार('मर्‍हाटा'काढल्यामुळे अत्र्यांनाही पत्रकार म्हणायला हरकत नसावी) तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.'१९९० पासुन बाळासाहेबांनी महाराष्ट्र धर्माला नख लावायला सुरुवात केली' म्हणतात्.मग तुम्ही १८ वर्ष मुग गिळून का बसला होता???राज ठाकर्‍यांनी सेना सोडण्यापुर्वी(सोडल्यानंतरही) तुम्ही अनेकदा सेनाप्रमुखांवर स्तुतीसुमने उधळली होती.तेंव्हा कुठे गेला होता तुमचा 'महाराष्ट्र धर्म'??अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते. अरे मराठीची इतकी वाईट परिस्थिती असताना तुम्हाला ती पुढे आणण्यासाठी आंदोलनाची गरजच का पडते??आंदोलन नव्हते तेंव्हा तुम्ही का लोकांना या विषयावर जागरुक केले नाही???तुमच्याकडे बंदुकिपेक्षाही घातक लेखणी नावाचे अस्त्र होते ते तुम्ही म्यानात ठेवुन 'चिल्लर' गोष्टींवर स्वतःचा स्तंभ भरवत होता.कधी राजकारण तर कधी काय. सगळ नॉन सेंस.मायमराठी भरडली जात असताना तुम्ही स्वतः त्याबद्दल लिहुन जनजागृती केली असती त्याला काही अर्थ होता.उगाच घडणार्‍या घटनांवर विश्लेशण करणे आणि याला त्याला दोष देणे फार सोपे असते.त्यात कंपुबाजी करुन 'पॉप्युलॅरीस्ट पत्रकारीता' करण तर अजुनच सोपं.सच्च्या पत्रकाराने शिवसेना मराठीचा मुद्दा सोडायला लागली असे वाटल्यावरच टिका केली असती. २ वर्षांपुर्वी राज ठाकर्‍यांनी सर्वसमावेशक धोरण घेतल त्याही वेळी 'भैय्यांना हटवायची गरज असताना सर्वसमावेशक धोरण कसल घेता??' म्हणुन राजवर हल्ला केला असता. पण तुम्ही यातल काहीच केल नाही.बहुतेक मनसेबरोबर जाउन चांगली संधी मिळेल असे तर तुमचे धोरण नाही ना??कारण पुण्यात समीरण वाळवेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी स्वतःच वृत्तपत्र सुरु करायचय असा मनोदय बोलुन दाखवला होता.मग त्याच्या संपादक पदी आपलीही वर्णी लागावी म्हणुन तुम्ही मनसेला पाठींबा करत नाही ना??मला भैय्यांबद्दल काडीचही प्रेम नाही.राज ठाकर्‍यांच्या भाषणाचा मीही फॅन आहे.त्यांच्या आंदोलनालाही माझा विरोध नाही.माझा विरोध स्वार्थी पत्रकारांना आहे.तुम्ही आधी शिवसेनेच्या कंपुत होता आता मनसेच्या कंपुत आहात. उद्या एखादा अजुन चांगला पर्याय आला तर तिकडेही जाल.अशी राजकीय कंपुगिरी करणार्‍या पत्रकारांनी सेनेला 'दिल्लीचे मनसबदार' तर शरद पवारांना 'वॉरलॉर्ड' म्हणन्याची गरज नाही.

आपला
चिन्मय कुलकर्णी

ता.क.-ज्या वेळी स्वातंत्र्याशी गरज होती आणि हिंदुविरुध्द 'डायरेक्ट ऍक्शन्स' होत होत्या त्या वेळी तमिळ लोकांनी द्रविडनाडुची मागणि केली होती.फाळणीवादी असलेल्या इतिहासातील तमिळ नेत्यांचीच करुणानिधी व समस्त कट्टर तमीळी पक्ष पिलावळ आहे.करुणानिधीने LTTE चा दोन नंबरचा म्होरक्या मारला गेल्यावर त्याच्यावर १ वर्षापुर्वी स्तुती करणारी कविता लिहुन ती प्रकाशित केली होती.महाराष्ट्राने या देशद्रोह्यांच्या पावलावर पाऊल का ठेवाव??

Friday, May 2, 2008

शिवसेनाश्रीवर्धन.कॉम


श्रीवर्धन शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक बालेकिल्ला. १९९५ पासून आजपर्यंत इथे शिवसेनेचा आमदार चढत्या फरकाने जिंकत आलेला आहे. २००६ च्या पोटनिवडणूकित नारोबा समर्थक शाम सावंतचा धुव्वा उडवून मा. आमदार श्री. तुकाराम सुर्वे यांनी शिवसेनेला बळ या विभागातून दिलेले आहे. बाळासाहेबांच्या २०% राजकारण आणि ८०% समाजकारणाच्या संकल्पनेतून कोकणचा १००% विकास शिवसेनेने केलाय यात कोणाचेही दुमत नाही. त्याच प्रकारे १९९५ नंतर श्रीवर्धन विकासाच्या दिशेने झेपावत आहे.

शिवसेना आमदार श्री. तुकाराम सुर्वेसाहेबांच्या संकल्पनेतून शिवसेनाश्रीवर्धन.कॉम वेबसाईट बनविली गेली आहे. मतदारसंघातील जडणघडणीची इत्यंभूत माहिती प्रत्येकाला मिळावी हाच हेतू या मागे आहे. श्रीवर्धन सारख्या दुर्लक्षित विभाग आज शिवसेनेमुळेच लोकांना माहित झालेला आहे. इथले अत्यंत आकर्षक असे पर्यटनस्थळे आज लोकांना माहित झालेत ते केवळ शिवसेनेमुळेच. कारण एखाद्या विभागाचे रस्ते आणि वाहतुक व्यवस्था सुरळीत असते तिथेच जास्तीत जास्त पर्यटकांची वर्दळ असते.

शिवसेनाश्रीवर्धन.कॉम या संकेतस्थळाचे उद्घाटन मा. शिवसेना कार्याध्यक्ष श्री. उद्धवजी ठाकरे यांच्याहस्ते २८ एप्रिल रोजी श्रीवर्धन येथे झाले.

नक्किच भेट द्या।
www.shivsenashrivardhan.com

Saturday, April 12, 2008

भुमिपुत्रांचा आधार शिवसेना

संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाल्यानंतर सुद्धा 'मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची' असं कुत्सितपणे म्हटलं जात होतं। परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी तरूणांच्या मागे ठामपणे उभे राहून इथल्या कारखान्यात, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये, व्यवस्थापनामध्ये स्थानिक भुमिपुत्रांना स्थान दिलं पाहिजे अशा प्रकारची कणखर भुमिका घेतल्यामुळेच आज अनेक ठिकाणी मराठी तरूण स्वाभिमानाने जगत आहे। भारतीय कामगार सेना असेल नाहितर स्थानिय लोकाधिकार समिती महासंघ असेल. या संघटनांनी मराठी तरूणांना त्यांच्या घामाचा आणि श्रमाचा मोबदला योग्य प्रकारे मिळवून दिला.

मुंबई महाराष्ट्राची आहे म्हणून इथल्या तरूणांचा तिच्यावर जास्त अधिकार आहे अशी वारंवार भुमिका शिवसेनाप्रमुखांनी स्पष्ट केलेली आहे। म्हणूनच एकेकाळी पंचतारांकित हॉटेलमध्ये मराठी तरूण अपवादानेच पहायला मिळत होता. परंतु शिवसेनाप्रमुखांनी कामगार सेनेच्या माध्यमातून अनेक तरूणांना पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकर्‍या मिळवून देऊन त्यांचे जीवनही पंचतारांकित केलं. मुंबईतील अनेक कारखाने आणि व्यवस्थापनामधील मराठी तरूणांची वर्णी लागली ती केवळ शिवसेनेमुळेच.

इतर प्रांतातले सत्ताधारी नेते आपल्या प्रांतातल्या लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात। मात्र महाराष्ट्रातल्या एकाही सत्ताधारी पक्षातील नेत्याला मराठी तरूणाबद्दल प्रेम वाटत नाही किंवा त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे याची जाणीव होत नाही. ती जाणीव केवळ शिवसेनाप्रमुखांनीच जोपासलेली आहे. आज मुंबईतून रेल्वेला जितका पैसा मिळतो तितका खचितच इतर कोणत्याही शहरातून मिळत नाही. किंबहुना संपूर्ण देशाची रेल्वेची जितकी आवक असेल त्यातील २५% आवक हि केवळ मुंबईतूनच होते. मात्र मुंबईत रेल्वेतील कर्मचारी पाहिल्यानंतर ते परप्रांतिय असल्याचेच दिसून येते. अलिकडे दोन वर्षापूर्वी रेल्वेमध्ये पुन्हा भरती प्रक्रिया सुरु झाली. सध्या रेल्वेमंत्री पद हे लालू यादव याच्याकडे असल्यामुळे संपूर्ण बिहार प्रांतातून नोकर्‍यांसाठी मुंबईत लोंढे उलटले. ही बाब शिवसेनेच्या लक्षात येताच इथे नोकरीसाठी आलेल्या बिहार्‍यांना पळवून लावण्यात शिवसैनिकांनी पुढाकार घेतला. कारण आधी महाराष्ट्रातल्या तरूणांना रोजगार द्या आणि मग इतरांचा विचार करा हि शिवसेनाप्रमुखांची भूमिका आहे.

केवळ शिवसेना मराठी तरूणांना नोकर्‍या देऊन थांबली नाही तर वेळोवेळी व्यवस्थापनाशी कामगारांच्या हितासाठी भांडून त्यांच्यात पगारवाढ घडवून आणली. त्यामुळेच अनेक मराठी तरूणांचे कुटुंब आज स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगत आहे. ज्यांना नोकर्‍या मिळाल्या नाहीत अशा तरूणांच्या मनामध्ये आत्मविश्वास जागृत करून त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले. शिवसेनेच्या स्थापनेच्या काही दिवसांतच शिवसेनाप्रमुखांनी लाचारीने कुणाच्या दुकानार काम करण्यापेक्षा स्वत:चे छोटे मोठे उद्योग सुरू करा अशी हाक दिली. त्यातूनच भायखळा येथे एका पदवीधर तरूणाने वडा-पावची गाडी सुरू केली. आज २५ वर्षांनंतर ग्रॅजुएट वडा-पाव म्हणून संपूर्ण मुंबई त्याला ओळखते. या वडा-पावच्या व्यवसायावरच या तरूणाचे जीवन इतके सुधारले की तो आज आपल्यासह संपूर्ण कुटुंबाचा निर्वाह तर करतोच परंतु अन्य काही तरूणांना काम देऊन त्यांच्या कुटूंबाचाही भार त्याने उचलला आहे. हे बळ फक्त शिवसेनाप्रमुखांच्या वाणीतच आहे.

साभार
: जनतेचं मंत्रालय.

Wednesday, April 9, 2008

हे पहा नवनिर्माण...


"बॉम्बे" चे "मुंबई" होऊन १३ वर्षे झाली तरी इथे मनसेवाले झोपा काढत आहे. महाराष्ट्राचे हेच नवनिर्माण का? शिवसेनेने मुंबईला मराठी नाव दिले परंतु यांच्या अमराठी लोकांना त्याचा दुस्वास का?

Saturday, March 29, 2008

मुंबईत ओळखपत्र लागू करणे काळाची गरज

महाराष्ट्राची राजधानी मुंबई हिंदुस्थानातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे एकमेव शहर आहे. देशाच्या एकूण उत्पन्नाच्या ४०% उत्पन्न देशाला केवळ एका मुंबईमधूनच मिळते. उद्योग, देशातील सर्वात मोठा शेअर बाजार, चित्रपटसॄष्टी, वेगवेगळ्या बड्या कंपन्यांचे मुख्यालये आणि बरीचसी ऐतिहासिक स्थळे या शहरात आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी संस्कृतीची आगळी वेगळी टाच या शहराला आहे.

उद्योगांचे शहर तसेच इथे काम केल्याने हमखास चांगला पैसा मिळत असल्याने देशातील इतर प्रांतातील लोकांचे लोंढे या शहरावर धडकायला लागले. यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या मागासलेल्या राज्यातील लोकांचे प्रमाण नक्किच काळजी करण्यासारखे आहे. त्यामुळे इथल्या प्रशासनाला मुंबईवर नियंत्रण करणे अवघड झाले आहे. आज मुंबईची अवस्था एकदम बकाळ झालेली आहे. मुंबई मराठी माणसाची असूनही इथे स्थानिक मराठी माणूस आज केवळ ४० टक्क्यांवर आला आहे. इथे ३० लाखापेक्षा जास्त बांग्लादेशी आणि इतर प्रांतातील लोकांचे प्रमाण ६० टक्के इतके आहे.

वाढणार्‍या लोंढ्यांच्या विरोधात शिवसेना अनेक वर्षे लढा देत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या राष्ट्रवादी विचारतून मुंबईच्या भल्यासाठी या शहरात 'परमिट सिस्टम' लागू करण्याची मागणी केली.समाजातील अनेक स्तरांतून या मागणीला पाठिंबा मिळत आहे. या सिस्टमचे अनेक फायदे बाळासाहेबांनी सांगितले आहेत. जर याची अंमलबजावणी झाल्यास हे मुंबईसाठी क्रांतिकारक निर्णय ठरणार आहे.

मुंबईची पर्यायाने महाराष्ट्राची आज लोकसंख्या किती आहे ते कोणीच सांगू शकणार नाही. सरकार दरबारी सगळी अनागोंदी सुरु आहे. मुंबईच्या अनेक फसव्या योजना येत आहेत. मुंबईला शांघाय करायचे स्वप्न पाहिले जातात आणि उत्तर प्रदेश आणि बिहार मधून सर्वाधिक गरीबरथ इथे सुरू करतात. हि किती मोठी विसंगती! खरेतर आज मुंबईसाठी कोणतीही योजना राबवायची असेल तर त्यापूर्वी लोंढ्यांचे काहितरी करावे लागेल. जो पर्यंत या लोंढ्यांवर नियंत्रण येत नाही तो पर्यंत इथे कितीही करोड खर्चाच्या योजना येऊ द्या सगळा पैसा राजकारण्यांच्या खिशातच जाणार. आणखी अतिशय महत्त्वाचे म्हणजे जर प्रामाणिकपणे या परिस्थित कोणतीही योजना सुरू केली तर त्याचा बट्ट्याबोळ होणार हे नक्कीच. याचे उदाहरण शिवशाही सरकारमध्ये बांधलेल्या ५५ उड्डाणपुलांचे देता येईल. रस्त्यांवरील रहदारी सुरळीत होण्यासाठीच्या ह्या चांगल्या योजनेमुळे मुंबईच्या वाहतुक व्यवस्थेचा पाहिजे तेवढा परीणाम दिसत नाही. कारण एकच रोज वाढणारी गर्दी आणि लोंढे. यात वाया जातोय तो फक्त महाराष्ट्राचा पैसाच!

याच साठी 'परमिट सिस्टम' म्हणजेच ओळखपत्र योजना त्वरीत अंमलात आणावी लागेल. अशा प्रकारच्या योजना परदेशात यशस्वी झालेल्या आहेत. अमेरिकेत सोशल सर्व्हिस नंबर शिवाय आपण हॉस्पीटलमध्येही प्रवेश करू शकत नाही. मुंबईत अशा प्रकारच्या योजनेने बांग्लादेशी घुसखोर, देशातील इतर प्रांतातील लोंढे आणि आतंकवादावरही नियंत्रण येवू शकेल.

जेव्हा एखादी योजना मुंबईसाठी लागू करण्याची मागणी केली जाते तेव्हा तिच्याआड येणारी बरीच लोक असतात. अर्थात त्यांचा येथील मुंबईकरांशी काहिही देणेघेणे नसते. समाजकंटक पक्षांच्या नेत्यांना तर यातील काहीही कळत नाही. केवळ मतांसाठी अशा योजनांना कचर्‍याचा डब्बा दाखविला जातो. मला वाटते अशा योजने बाबतीत मुंबईकरांनी जागृत असणे आवश्यक आहे.

मित्रांनो विचार करा जर आपण मुंबईत अधिकृतपणे राहतो, आपण सुखाने आणि आपल्या कररूपाने भरलेल्या पैशाचे हक्कांची अपेक्षा करत असू तर या योजना जेव्हा पुढे येईल तेव्हा जरूर पाठिंबा द्या. मुंबईतील लोकलवरील ताण कमी व्हावा असे वाटत असेल, जर आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित व्हावे असे मनापासून वाटत असेल ओळखपत्र योजनेचा आपण स्विकार कराल यात वादच नाही. मान्य आहे इतर प्रांतातील आणि अनधिकृतपणे राहणार्‍या लोकांना मुंबई सोडावी लागेल. सर्वांना मुंबईत प्रवेश मिळणार नसेल तर हिंदुस्थानातील प्रत्येक प्रांतातिल सत्ताधार्‍यांना त्यांच्या राज्याच्या विकास करावाच लागेल आणि एक विकसित देश म्हणून आपला देश ओळखला जाईल.

मित्रांनो आपली मते नक्कीच कळवा.

Saturday, March 22, 2008

एक निस्वार्थी नेतृत्व - बाळासाहेब

बाळासाहेब ठाकरे - आमचे लाडके साहेब, राजकारणात असूनही राजकारणापलिकडे निर्णय घेणारे एकमेव निस्वार्थी नेते।राष्ट्रवादीचे दत्ता मेघे यांनी पक्ष सोडण्याची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती, तेव्हा त्यांनी सांगितले कि, शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उद्धवजींजवळ चर्चा झाली होती. उद्धवजींनी बाळासाहेबांना विचारून सांगतो असे म्हटले. बाळासाहेबांचे उत्तर आले, जर मेघे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला शरद पवारांची हरकत नसेल तर तुम्ही प्रवेश करू शकता.

इथे प्रश्न पक्ष प्रवेश करण्याचा किंवा शरद पवारांच्या हरकतीचा नसून एक पक्षप्रमुख एका नेत्याला प्रवेश नाकारतो कारण त्या नेत्याच्या पक्ष प्रमुखाला आवडणार नाही।आजचे राजकारण हे फक्त तोडफोडीचेच सुरू असताना शिवसेनाप्रमुखांनी घेतलेला निर्णय खरोखरच क्रांतीकारक आहे. इथे रोज कोणीतरी पक्ष सोडतोय आणि पत्रकार परिषदांमधून बोंबाबोंब करत सुटतोय.

दोन वर्षापूर्वी नारोबाला शिवसेनेतून हाकलल्यानंतर नारोबा रोज दोन-चार पत्रकारांना जमा करून छाती बडवून सांगत असे त्याच्यावर कसा अन्याय झाला आणि त्याच्याबरोबर सेनेचे ४२ आमदार आणि १० खासदार आहेत. पण आता प्रत्यक्षात किती गेले ते सर्वांना माहितच आहे. तसेच हि सगळी थेर केवळ काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री करावे यासाठी होती हे सुद्धा उघड आहे।

त्यानंतर काही महिन्यांनी राज ठाकरेनी शिवसेना सोडताना घोषणा केली, विठ्ठलाच्या आजुबाजुचे दोन-चार बडवेच शिवसेनेत राहतील बाकी सगळे शिवसेना सोडतील। झाले ते याउअलट! त्याच्याबरोबर शिवसेना सोडून गेलेले राजा चौगुले किंवा जितेंद्र जनावळे सारखे शिवसैनिक काही दिवसात परतलेच परंतु नंतर जवळजवळ ४०% लोक शिवसेनेत पुन्हा आले. त्यानंतर शिवसेनेने रामटेक लोकसभा, श्रीवर्धन विधानसभा, मुंबई, ठाणे, नासिक, पुणे, नागपूर अशा महानगर पालिका निवड्णूकांमध्ये प्रचंड यश मिळवून राज ठाकरेला त्याची जागा दाखवून दिली.

आताच काहि महिन्यांपूर्वी काँग्रेसचे कर्नल सुधिर सावंत यांनी पक्ष सोडताना ४० काँग्रेजी आमदार आणि ५ खासदार सोबत असल्याची घोषणा केली।(आकडे नारोबांच्या जवळपासचेच, कोकण पॅटर्न असावा!).

पक्ष सोडणार्‍या या तथाकथित पुढार्‍यांना वाटत असावे कि आम्ही पक्ष सोडला म्हणजे तो पक्ष संपला, आणि हे ज्या पक्षात जाणार असतात किंवा पक्ष काढतात तो एकमेव लोकांसाठी काम करणारा पक्ष असतो। प्रत्यक्षात अशा लोकांना जनता भिक घालत नाहीच कारण लोकांना माहित असते हे आपल्या पक्षासाठी काही करू शकले नाहीत आमच्यासाठी काय करणार?

पण दत्ता मेघेंनी पक्ष सोडण्याच्या पत्रकार परिषदेतच पक्ष न सोडण्याचा निर्णय सोडण्याचा निर्णय घेतला कारण त्यांचे त्यांच्या नेत्यावर असणारे प्रेम, आणि बाळासाहेबांनी घेतलेल्या क्रांतीकारक निर्णय हेच आहे। दत्ता मेघे सेनेत आले असते तर विदर्भात सेना आणखी मजबूत झाली असती कदाचित विरोधकाना विदर्भातून हद्दपारही केले असते याची साहेबांना पूर्णपणे कल्पना होती. पण जवळचा माणूस पक्ष सोडून गेल्याने ज्या वेदना होतात त्याची कल्पना असल्यानेच शरद पवारांचे ५० वर्षाचे सोबती दत्ता मेघेंना शिवसेना प्रवेश नाकारला असावा.

खरच साहेब तुम्ही महान आहात हे पुन्हा एकदा समोर आले. तुम्हाला लाख लाख सलाम!